शिरसोली येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या गारपीट वाऱ्यासह नागवेल तांड्याच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान; शेतकरी हवालदिल

0

प्रतिनिधी, प्रज्वल बारी

महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी;शेतकऱ्यांची मागणी!

जळगाव:- तालुक्यातील शिरसोली येथे २९ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट वाऱ्यासह नागवेल तांड्याच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिरसोली येथे नागवेल तांड्याची शेती जास्त प्रमाणात केली जाते. शनिवारी सायंकाळी अवकाळी पाऊस व गारपीट वाऱ्यासह झाल्याने नागवेल तांड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.